पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसा आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर जनसमुदायाला संबोधित करताना केसीआर यांनी महाराष्ट्रात सरकार शेतकरीविरोधात काम करत असल्याचा आरोप केला. आपल्या पक्षप्रवेशावेळी भगीरथ भालके यांनी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कार्यांचा गौरव केला.
हेही >>> बीआरएस भाजपची बी टीम; केसीआर यांची नौटंकी सुरु; महाराष्ट्रावर कोणताही परिणाम नाही : संजय राऊत
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्य़ा केसीआर यांनी आज पंढरपूरच्या विठ्चलाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी त्यांनी पंढरपूर येथून सुरवात केली असून राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांचे चिरंजिव भगिरत भालके यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.
सरकोली येथे जनसमुदायाला बोलताना ते म्हणाले, “स्वातंत्र्याचा लढा पून्हा सुरु करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे होउनही आपण मागास राहीलो आहोत. महाराष्ट्रात सर्व पक्षांना सत्ता भोगली पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष असे काही केले नाही. प्रत्येक पक्षाने संधी गमावली. आता एकदा बीआरएसला संधी द्या” असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी “तेलंगाणात शेतकऱ्यांचे आणि पददलितांचे सरकार आहे. महाराशष्ट्रात सत्ता भोगलेल्या नेत्यांचे दिवाळं काढणार असून शेतकऱ्यांसाठी हि दिवाळी असेल त्यामुळेच बीआरएस म्हणजे भारत परिवर्तन पार्टी होय.” बीआरअसचा धसका महाराष्ट्रातील पक्षांनी घेतल्याचेही ते म्हणाले.