कुद्रेमनी / प्रतिनिधी : परतीच्या पावसाने कुद्रेमनी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाला इतका जोर होता की कुद्रेमानी फाट्याजवळ असलेल्या पुलावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे बेळगाव वेंगुला रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यामुळे बेळगावहून जाणाऱ्या वाहनांची आणि चंदगडहून बेळगावला येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाने सर्वांची दाणादाण उडवून सोडली. गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने अधिक जोर धरला. बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती.
Trending
- विदेशी महिलेला जंगलात चक्क साखळदंडाने बांधले
- … तो जबरदस्तीने घरात घुसू लागला अन्…
- वादळी पावसाचा राज्याला दणका
- सर्व आमदारांची कामे होतील
- ‘जुन्या इमारतीं’साठी विधेयक आणणार
- अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी दोघा सिरियल किलरना जन्मठेप
- लोकसभेच्या धक्क्यातून सावरण्यासाठीच लोकप्रिय घोषणा; महापुरात तरी सापत्न वागणूक नको- सतेज पाटील
- पुराचा विळखा, स्थलांतर सुरू