वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाचे आर्थिक वर्ष संपत आले आहे. या वर्षात सरासरी विकास दर 7 टक्के राहील, असे अनुमान सरकारने व्यक्त केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांच्या अहवालानुसार भारताचा विकास दर 6.5 टक्क्मयांपेक्षा अधिक होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, नव्या अनुमानानुसार तो 7 टक्के राहील.
शेवटच्या तीन महिन्यात आर्थिक विकास दराने मोठी झेप घेतल्याचे दिसून येत आहे. मागणी आणि उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनाची टांगती तलवार अद्याप कायम असली तरी त्याचा जोर कमी झाला असल्याने अर्थव्यवस्थेवरचा अतिरिक्त दबाव संपुष्टात येण्यास प्रारंभ झाला आहे. पोलाद, सिमेंट, वीज आदी महत्त्वाच्या वस्तूंचे उत्पादन वाढले असल्याने भविष्यकाळाबद्दल आशा निर्माण झाली आहे.
वित्तक्षेत्र, मालमत्ता विकास आणि बांधकाम क्षेत्राचा विकास दर या वर्षात 6.4 टक्के राहील, अशी शक्मयता असून तो मागच्या वषीच्या 4.2 टक्क्मयांपेक्षा पुष्कळच अधिक आहे. सेवा क्षेत्रामध्येही प्रगती दिसून आल्याने आरोग्य, शिक्षण, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांकडून अधिक मागणी वाढलेली आहे.