महावितरण कार्यालयावर पाणी संघर्ष समिती व सर्व पक्षीय भव्य मोर्चा
कडेगाव : प्रतिनिधी
वीज जरदरवाढ कमी करावी.शेतकर्यांना अखंड आठ तास वीज पुरवठा करावा. धोकादायक तारा, पोल, डी पी दुरुस्ती करावे ,सतत होणारा विजेचा खेळखंडोबा थांबवावा यासह आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी कडेगाव शहरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते डी.एस.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळ समिती व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हल्लाबोल मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले.दरम्यान यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी हलगी वाजवत तसेच महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला.
विजेच्या समस्याबाबत व प्रलंबित मागण्यासाठी बुधवार ( दि 10 ) रोजी सकाळी 10 वा च्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चास सुरुवात केली.यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातून थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडकला.जोरदार घोषणाबाजी व हलगी वाजवत या मोर्चाने महावितरणवर हल्लाबोल केला.
यावेळी विजय शिंदे ,संतोष डांगे , विजय गायकवाड ,दीपक न्यायणीत ,शशिकांत रासकर ,मनोजकुमार मिसळ, सिद्दिक पठाण , प्रकाश गायकवाड, वसंत इनामदार, मोहन जाधव,जयवंतराव पवार,सुभाष भोसले,जगदीश महाडिक,जीवन करकटे ,दत्तात्रय भोसले ,रघुनाथ गायकवाड ,जगन्नाथ नायकवडी ,नितीन शिंदे ,अभिमन्यू वरुडे, विजय भोसले, यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.