Hemanta Sarma Biswa : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी लचित बारफुकनच्या 400 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याचे कौतुक करताना “भारतात केवळ औरंगजेब, बाबर, जहांगीर किंवा हुमायून यांच्याच कथा नाहीत” असे इतिहासकारांना संबोधून म्हटले आहे. सरमा म्हणाले की, लचित बारफुकनच्या शौर्यामुळे आसाम प्रांत मुघल सम्राट औरंगजेबाचा प्रतिकार करू शकला.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, “माझी इतिहासकारांना नम्र विनंती आहे. भारतात ही केवळ औरंगजेब, बाबर, जहांगीर किंवा हुमायूनचा इतिहास नाही. भारत हा लचित बारफुकन, छत्रपती शिवाजी, गुरु गोविंद सिंग, दुर्गादास राठौर यांचाही आहे. आपण नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळेच आमचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होईल” “लचित बारफुकनची अभिमानास्पद गाथा देशासमोर आणण्याचा आमचा हा नम्र प्रयत्न आहे. मात्र सरकारचे केवळ प्रयत्न पुरेसे नाहीत. लोकांकडून, इतिहासकारांकडूनही प्रयत्न व्हायला हवेत,” असे ते म्हणाले.