वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ येत्या जुलै महिन्यात झिंबाब्वेच्या दौऱ्यावर जाणार असून उभय संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेला 6 जुलैपासून प्रारंभ होईल.
अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 29 जूनला संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ झिंबाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर या मालिकेतील सर्व सामने अनुक्रमे 6, 7, 10, 13 आणि 14 जुलैला खेळविले जातील.