ठाण्यात मंगळवारी सकाळी भरलेल्या कंटेनरने एका जीपला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा प्रवासी जागीच ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. भिवंडीतील मुंबई- नाशिक महामार्गावरील खडवली चौकात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पडघा गावातून खडवली रेल्वे स्थानकाकडे 11 प्रवाशांना घेऊन जाणारी जीपला हा अपघात झाला. सर्व मृतांची ओळख पटली असून जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साबळे यांनी घटनास्थळावरून माध्यमांना या अपघाता बाबत माहीती देताना म्हटले आहे कि, “नाशिक येथून कांद्याने भरलेला कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. संततधार पावसामुळे चालकाचे अवजड वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने जिपला जोरदार धडक दिली. अपघातानंतर जीप मुख्य रस्त्यापासून जवळपास 100 फूट फरपटत रस्त्याचा बाजूला फेकली गेली.”
पुढे बोलताना त्यांनी चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले आहे. घचनेनंतर लगेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात पळवले. मात्र सहा जणांना त्यातील सहा जणांना मृत घोषित करण्यात आले, तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत.