बेळगाव– महाराष्ट्रातील लोक तसेच नेते मंडळींना महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्नाचा विसर पडत आहे. येथील लोक हे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी 66 वर्षांपासून लढा देत महाराष्ट्रात जाण्याची आपली तीव्र इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु महाराष्ट्रात मात्र केवळ ठराव मांडून त्यांना वार्यावर सोडले जात आहे. सीमावासीयांच्या व्यथांवर केवळ ठराव मांडून चालणार नाहि तर ठोस भूमिका मांडा, असे प्रतिपादन कोल्हापूरचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त करत महाराष्ट्र सरकारला घरचा आहेर दिला. काळय़ादिनानिमित्त काढण्यात आलेल्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर उपस्थित होते. ते म्हणाले, बेळगावचा सीमाप्रश्न हा देशातील सर्वात मोठा चाललेला लढा आहे. आज चौथी पिढी सीमा प्रश्नासाठी लढा देत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सातत्याने सीमा खटल्यासाठी पाठपुरावा करीत असतात. येत्या ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आमदार, खासदारकीच्या निवडणुकांमध्ये म. ए. समितीचा भगवा झेंडा फडकेल याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती अस्वस्थ असतानाहि ते सीमावासीयांच्या प्रेमाखातर सभेला उपस्थित होते. सीमावासीयांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, लोकशाहि मार्गाने आम्ही लढा देत आहोत. बेळगावमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाचीच मातृभाषा मराठी असणार असल्यामुळे ती बदलणे शक्य नाहि. आमचा लढा सुरू आहे. परंतु अद्याप आम्हाला यश आलेले नाहि. तरुण पिढीला जोडीला घेऊन हा लढा नक्कीच यशस्वी होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Trending
- छत्रपती असल्याचा पुरावा मागणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली लढता ; हा गादीचा अपमान नव्हे का ?
- पोस्टल मतदानावेळी मतदारांनी सतर्कता बाळगावी – सागर नाणोसकर
- कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क !
- अभिनेत्री रुपाली गांगुली, ज्योतिषी अमेय जोशी यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
- ‘म्हादई’ काँग्रेससाठी राजकारणाचा विषय
- जनतेमधील उत्साह हाच भाजप विजयाचा पुरावा!
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला श्रीपादभाऊंच्या कार्याचा गौरव
- अभियंत्याचे अपहरण करून लुबाडणूक