कोल्हापूर / प्रतिनिधी :
धामणी नदीवरील बळपवाडी (ता. पन्हाळा) ते गवशी-पाटीलवाडी (ता. राधानगरी) दरम्यान शेतकऱ्यांनी कष्टाने व स्वखर्चाने घातलेला मातीचा बंधारा पाण्याच्या प्रचंड दाबामुळे आज सकाळी ७ वाजता वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बंधारा फुटण्याला पाटबंधारे विभाग पूर्णता जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.