बेळगाव : ‘तरुण भारत संवाद’च्या सातारा आवृत्तीमध्ये वितरण विभागात कार्यरत असणारे मंदार कोल्हटकर व धीरज पाटील यांच्या अपघाती निधनाबद्दल तरुण भारत परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पुणे-बेंगळूर महामार्गावरील वाईनजीक एका कारने धडक दिल्याने हे दोघे दुचाकीवरून बाजूला फेकले गेले व त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने तरुण भारत परिवारावर शोककळा पसरली आहे. तरुण भारतच्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत बेळगाव कार्यालयामध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात आली. आपल्या दोन सहकाऱ्यांचे अपघाती निधन व्हावे ही अतिशय दु:खदायक बाब असल्याची भावना व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात तरुण भारत परिवार सहभागी आहे, असे त्या म्हणाल्या. दोन मिनिटे मौन पाळून तरुण भारत परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात केली.
Previous Articleविकासाचा बॅकलॉग भरून काढणार
Next Article पैसे घेऊन जाण्यासाठी नोटिसा आल्याने शेतकरी तणावात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.