- 16 जूननंतर यात्रा सुरू करण्याबाबत करणार विचार
ऑनलाईन टीम / देहरादून :
चारधाम यात्रा सुरू करण्याबाबतचा आदेश उत्तराखंड सरकारने स्थगित केला आहे. ही यात्रा का स्थगित केली जात आहे याचे कारण देखील सरकारने दिले आहे. प्रदेश सरकारने सांगितले की, चारधाम यात्रेवरून नैनिताल हाय कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे चारधाम यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/Screenshot_20210615-0903212.png)
दरम्यान, प्रदेश सरकारने कालच म्हणजेच सोमवारी चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी मधील नागरिकांसाठी काही शर्तींसह चारधाम यात्रा सुरू करत असल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारने आपला हा निर्णय बदलला असून पुन्हा एकदा यात्रा स्थगित केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शासकीय प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी सांगितले की, नैनिताल हाय कोर्टात चारधाम यात्रे संबंधात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले की, 16 जून नंतर ही यात्रा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल.