ऑनलाइन टीम / मुंबई :
चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेले कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर अपेक्षित खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. वडेट्टीवार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह अधोरेखित झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, विस्तारानंतर इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन खाते मिळालेले वडेट्टीवार नाराज होते.