Sharad Pawar : गुजरातमधील अहमदाबाद उच्च न्यायालयाने नरोडा गाम हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या हत्याकांडात मुस्लिम समाजातील ११ जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालानंतर राष्ट्रवीदी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संशयित आरोपीना निर्दोश मुक्त केल्यानंतर या हत्या कुणी केल्या हा प्रश्न उरतो असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्याकांच्या सामूहिक हत्या झाल्या होत्या. काही नेत्यांचे निकटवर्तीय यात सामील होते. बरेच वर्ष खटला सुरू होता. काल न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मग प्रश्न असा उरतो कि त्यांची हत्या कोणी केली? त्यांची हत्या कशी झाली? सत्तेचा दुरुपयोग सरकारमध्ये असलेल्या लोकांनीच केला आहे.” असे ते म्हणाले.
28 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा ट्रेन जाळल्याच्या निषेधार्थ ‘बंद’ पुकारण्यात आल्यानंतर नरोडा गाम परिसरात झालेल्या जातीय हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात माया कोडनानी यांच्यासह इतर प्रमुख आरोपींमध्ये बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांचाही समावेश होता. दंगल आणि हत्येव्यतिरिक्त, 67 वर्षीय माया कोडनानी यांच्यावर गुन्हेगारी कट आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला होता. कोडनानी यांच्या बचावासाठी सप्टेंबर 2017 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखिल साक्ष तपासली गेली.
विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणातील एकूण 86 आरोपींपैकी 18 आरोपींचा मध्यंतरीच्या काळात मृत्यू झाला. खटल्यादरम्यान सुमारे 182 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले.
दंगल आणि हत्येव्यतिरिक्त, 67 वर्षीय कोडनानी यांच्यावर नरोडा गाम प्रकरणात गुन्हेगारी कट आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील सप्टेंबर 2017 मध्ये कोडनानीच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून हजर झाले होते.