मुंबई :
आयफोन निर्मिती कंपनी अॅपलकडून आगामी काळामध्ये भारतात 5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पुढील तीन वर्षाच्या काळामध्ये अॅपल ही कंपनी जवळपास 5 लाख जणांना विविध पदांवर भरती करून घेणार आहे. सध्याच्या घडीला अॅपलकडून भारतामध्ये विविध स्तरावर दीड लाखहून अधिक जणांना रोजगार दिला गेलेला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीकडून अॅपलचे दोन कारखाने चालवले जात असून यांचा रोजगार उपलब्ध करण्यामध्ये मोठा वाटा राहिला आहे. अॅपल आगामी काळामध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. 2023 मध्ये पहिल्यांदाच अॅपलने भारतामध्ये सर्वाधिक महसूल प्राप्त केला आहे.