प्रतिनिधी / बेळगाव : बुधवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर कॅम्पमधील नागरिकांनी आज पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ज्या ठिकाणी आरहांचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी कॅम्प परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव व महिला तसेच अन्य नागरिक दाखल झाले आहेत.
या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. हा अपघात केवळ पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान वाहतूक पोलीस विभागाने आता ही बाब गांभीर्याने घेतली असून गुरुवारी सकाळी सर्व अवजड वाहने आणि ट्रक पिरनवाडी नजीक थांबविण्यात आली आहेत. दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान नंतर अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे.