बिपरजॉय चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे राजस्थानमधील बारमेर, जालोर, सिरोही, पाली आणि राजमसंद या पाच जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहीती राजस्थान शासनाच्या आपत्तकालीन अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत बाडमेर, जालोर, सिरोही, जोधपूर आणि पाली या चक्रीवादळग्रस्त जिल्ह्यांना भेट देणार असल्याचेही ते म्हणाले. आणि तेथील बाधित लोकांशी संवाद साधतील.
बाडमेरमध्ये गेल्या पाच दिवसांत १९२.३७ मिमी पावसाची नोंद झाली असून जालोरमध्ये 419.10 मिमी पाऊस पडला आहे. सिरोहीमध्ये 464.66 मिमी पाऊस पडला तर राजमसंदमध्ये 15 जून ते 19 जून या कालावधीत 1.92 मिमी पाऊस पडल्याची सरकारी आकडेवारीनुसार नोंद झाली आहे.
याच कालावधीत पाली येथे 318.70 मिमी पावसाची नोंद झाली असून मुताना येथे गेल्या 24 तासांत 530 मिमी पाऊस पडला असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. पालीतील (609.6mm-1219.2mm) अनेक रस्त्यांवरील पाण्याची पातळी सुमारे दोन ते चार फूट वाढली आहे. राजस्थानच्या पुर आणि आपत्कालीन विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाली येथील 54 पैकी 23 धरणे आणि सिरोहीमधील 29 पैकी 27 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.