काँग्रेसमधल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे सामुदायिक राजीनामे
सावंतवाडी प्रतिनिधी
काँग्रेसच्या प्रभारी जिल्हा अध्यक्षपदी समीर वंजारी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर अवघ्या एका दिवसातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निष्ठावंत व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामुदायिक राजीनामे दिलेआहेत. सदरचे राजीनामे काँग्रेसचे अखिल भारतीय कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व सरचिटणीस केशी रेणुगोपाल व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे पत्राद्वारे सामुदायिक राजीनामे पाठवत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये प्रभारी जिल्हा अध्यक्ष निवडीनंतर दोन गट निर्माण झाले आहेत. सदरच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व सर्व तालुकाध्यक्षांनी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अपमान केला आहे. असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे