यंदाच्या हंगामात उसाला पाच हजार रूपये दर द्यावा : साखर कारखानदार व सरकारने अडेलतट्टूपणा सोडावा : हणमंतराव पाटील यांचा इशारा
कुरळप वार्ताहर
वाळवा तालुक्यातील येडानिपाणी आाणि कामेरी या दोन गावांच्या दरम्यान रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्याकडून साखरेचे ट्रक व दुधाचे टँकर रोखून ठेवण्यात आले. रात्रीच्यावेळी शेकडोच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी साखर कारखानदारांनी व सरकारने अडेलतट्टूपणा सोडावा व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम द्यावा, अशा घोषणा व मागण्या केल्या. जवळपास दोन तास साखरेचे ट्रक व दुधाचे टँकर थांबवल्याने काहीकाळ महामार्गावरती तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावरती हे ऊस दरवाढीबद्दलचे आंदोलन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवारी 16 ऑक्टोबर रोजीच्या रात्री नऊच्या सुमारास बेळगावकडून मुंबईकडे जाणारे साखरेचे भरलेले ट्रक व दुधाची वाहतूक येडानिपाणी – कामेरी दरम्यान आाशियाई महामार्गावर रोखून ठेवली. कोल्हापूर जिह्यातील साखर कारखान्याची 35 टन भरलेली साखरेची ट्रक अडवून सदर ट्रक चालकास दोन तास थांबवून ठेवण्यात आले. कारखाना प्रशासनाने आम्ही पुन्हा साखर पाठवणार नाही, असे सांगितल्यावर ट्रक सोडण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा सर्व कारखानदार मागील वर्षीच्या गाळप केलेल्या उसाला दिवाळीपूर्वी 1 हजार ऊपये व यंदाच्या हंगामात प्रा†तटन पाच हजार ऊपये उसदर मिळाला पाहिजे. तसेच दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करावी. या प्रमुख मागण्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या.
तसेच सांगली जिह्यातील सर्व साखर कारखान्यांनी दोन दिवसांत निर्णय नाही घेतला तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या गानिमी काव्यानुसार मुंबईला जाणारी साखर, दूध, भाजीपाला वाहतूक बंद करणार आहोत. वेळप्रसंगी साखरेचे ट्रक ही जाळणार आहोत. कोणताही शेतीमाल मुंबई तसेच पुण्यास जाऊ देणार नाही. कोल्हापूर जिह्यातील एकही दुधाचा टँकर कोणत्याही मार्गे जाऊ देणार नाही. रघुनाथदादा पाटील यांचे आदेशानुसार थांबलेली आंदोलने पुन्हा चालू करणार असल्याचा इशाराही यावेळी हणमंतराव पाटील यांनी दिला.
यावेळी धनपाल माळी, प्रणव पाटील, लक्ष्मण पाटील, केतन जाधव, अशोक माळी, बाळासो मगदूम, विनोद चव्हाण, वैभव दाइंगडे, कृष्णात पाटील, दीपक पवार, आ†वनाश चव्हाण आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हिच आंदोलनाची ठिणगी समजावी..!
साखर कारखानदारांसोबत सरकारही अडेलतट्टूपणाची भुमिका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत घेत आहे. या दोघांनीही अडेलतट्टूपणा सोडावा. शेतकऱ्यांच्या घामाचे दाम त्यांना वेळेत द्यावेत. आजपर्यंत शेतकऱ्याला पिळून खाण्याचे काम साखर कारखानदारांनी केले आहे. आता ऊस उत्पादक शेतक्रयांचा शिकलेला पोरगा चांगला जाणकार बनला आहे. याचा साखर कारखानदारांनी विचार करावा व गेल्या वर्षीचे 1 हजार ऊपये व यंदा गाळप होणाऱ्या उसाला 5 हजार ऊपये असा दर द्यावा. ही ऊस दर आंदोलनाची यावर्षीची पहिली ठिणगी समजावी.
हणमंतराव पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष, रघुनाथदादा शेतकरी संघटना