कोळिसरे गावातील घटना; जयगड परिसरात खळबळ; एक महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह
रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील जयगड नजीकच्या कोळिसरे कोठारवाडी येथे नवदाम्पत्याने गळफासाने आत्महत्या केल़ी ही घटना रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास उघडकीस आल़ी एकाच दोरखंडाला जोडप्याने गळफास घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आह़े या जोडप्याचा केवळ एका महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालेला असताना आत्महत्येमागील कारणाचा अद्याप उलगडा झालेला नाह़ी या घटनेची नोंद जयगड पोलिसांकडून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आह़ेआह़े.
संदीप जयवंत गोताड (27) व पूजा संदीप गोताड (25) अशी मृतांची नावे आहेत़ दोघांचेही मृतदेह स्वयंपाकघरातील लाकडी भालाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आह़े घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल़े