सामाजिक विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा मांग, म्हेतर, वाल्मिक व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांनी लाभ घेऊन आपल्यासह समाजाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. याकरिता शासन सदैव आपल्या सोबत राहील असे आवाहन आमदार राजू आवळे यांनी केले. ते सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विविध कल्याणकारी योजनाची माहिती कार्यशाळेत बोलत होते.
सामाजिक न्याय विभागाच्य़ा विविध योजनांपासून मांग, म्हेतर व वाल्मिकी समाज वंचित असून त्यांचा विकास झालेला दिसून येत नाही. याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित आजच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेचा निश्चित उपयोग होईल असे मत इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूत यांनी मांडले.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-26-at-7.57.43-PM-1024x682.jpeg)
विभागाचे तालुका समन्वयक सचिन कांबळे यांनी बोलताना “भारतीय संविधानाच्या अनु. 46 नुसार अनुसूचित,जाती जमाती इतर मागासवर्गीय तसेच वंचित व दुर्बल घटकांचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची तरतूद असून सामाजिक न्याय विभाग अनेक पातळीवर करत आहे” अशी माहीती दिली.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-26-at-7.57.43-PM-1-1024x682.jpeg)
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये विभागाच्या निरिक्षिका कल्पना पाटील यांनी सांगितले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत भारतीय रिझर्व बँक स्थापना दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन मा. विशाल लोंढे ,सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आज मांग, म्हेतर व वाल्मिकी घटकांसाठी योजनांची प्रचार प्रसिद्धी कार्यशाळा इचलकरंजी येथे संपन्न होत असून योजनांचा लाभ सर्व समाज घटकांनी घ्यावा असे आवाहन केले.
सदर कार्यक्रम मा.आमदार .श्री राजू (बाबासो) आवळे,सदस्य रमाई आवास योजना( ग्रामीण क्षेत्र ) विधानसभा सदस्य यांचे अध्यक्षतेखाली पार पडली कार्यक्रमास श्री. प्रदीप ठेंगल उपायुक्त इचलकरंजी महानगरपालिका व श्री. उत्तम कोळी गृहपाल यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आशा रावण समतादूत यांनी केले तर आभार श्री.नीलम गायकवाड कनिष्ठ लिपिक सहायक आयुक्त ,समाज कल्याण कोल्हापूर यांनी केले. सदर कार्यक्रमामधून मांग,म्हेतर व वाल्मिक व इतर अनुसूचित जाती व नाबबौद्ध घटकातील ६०० नागरिकांनी योजनांच्या माहितीचा लाभ घेतला सदर कार्यक्रमासाठी श्री निलेश चौरे श्रीमती सुषमा तराळ श्रीमती प्रतिभा सावंत श्रीमती पूजा धोत्रे गौरी पवार तृतीयपंथी कार्यालय सहाय्यक तसेच इतर मान्यवर व सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजीतील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.