अभिभाषण वाचण्यास नकार : दोन मिनिटांत सभागृह सोडले
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूमध्ये राज्यपाल आर. एन. रवी आणि सत्ताधारी द्रमुक यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यपालांनी तामिळनाडू विधानसभेला संबोधित करण्यास नकार दिला. मी माझ्या अभिभाषणाच्या आधी आणि नंतर राष्ट्रगीत वाजवण्याची विनंती केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच अभिभाषणातील अनेक मुद्यांशी आपण असहमत असून ते मी सभागृहात बोलणे संविधानाची थट्टा करणारे ठरेल, असे ते म्हणाले. यासंदर्भात सभागृहाचा आदर करत मी माझे भाषण येथे संपवत आहे. लोकांच्या कल्याणासाठी या सभागृहात अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चा व्हावी, अशी आपली इच्छा असल्याचे आपल्या अभिभाषणाचा समारोप करताना राज्यपाल म्हणाले. आपल्या या संदेशानंतर अवघ्या 1 मिनिट 19 सेकंदात राज्यपालांनी विधानसभेतून सभात्याग केला.
तामिळनाडूमध्ये राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाचे नवे प्रकरण समोर आले आहे. राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेतील आपले भाषण दोन मिनिटांपूर्वीच संपवले. तामिळनाडूचे राज्यपाल रवी यांनी विधानसभेत भाषण सुरू केल्यानंतर लगेचच सरकारने तयार केलेल्या संबोधनाशी ते असहमत असल्याचे सांगून त्याचा समारोप केला. तमिळनाडूच्या राज्यपालांचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यात यापूर्वीही अनेक तणाव निर्माण झाले आहेत. रोख रक्कम आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तुऊंगात असलेले वीज आणि उत्पादन शुल्क मंत्री सेंथिल बालाजी यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला न घेता थेट बडतर्फ करण्याचा आदेश देऊन ते वादात सापडले होते. मात्र, काही तासांतच राजभवनने निर्णय स्थगित ठेवला आणि अॅटर्नी जनरलकडून सल्ला मागितला. या निर्णयामुळे स्टॅलिन सरकार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यपालांवर सातत्याने हल्ला करत आहेत.
सरकारवर आरोप
राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मी अनेकवेळा भाषणाच्या सुऊवातीला आणि शेवटी राष्ट्रगीत वाजवण्याची विनंती केली होती आणि सल्ला दिला होता. राष्ट्रगीताचा आदर करा, असा सल्लाही मी दिला होता, पण त्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले.’ तसेच सभागृहाचे कामकाज चांगले चालावे आणि अधिकाधिक कामकाज व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर लगेचच विधानसभा अध्यक्ष एम. अप्पावू यांनी संपूर्ण भाषण तामिळी भाषेतून वाचून दाखवले.
यापूर्वीही संघर्ष
तामिळनाडूचे स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यात अनेक मुद्यांवरून यापूर्वीपासून वाद सुरू आहेत. राज्यपाल रवी यांनी सप्टेंबर 2021 मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. स्टॅलिन सरकारने 2022 मध्ये राज्य सरकारने केलेल्या पॅबिनेट शिफारशी आणि 10 पेक्षा जास्त विधेयकांना मंजुरी देण्यास विलंब केल्याचा आरोप केला. यानंतर राज्य सरकारने आर. एन. रवी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती.