नवरात्री उत्सवात अनेक जण नऊ दिवस उपवास करतात. यावेळी अनेकदा साबुदाण्याची खिचडी आणि वरई खाऊन कंटाळा येतो. किंवा ते खाण्याचीही इच्छा होत नाही. म्हणूनच आज आपण एक उपवासाची एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
वरईचे तांदूळ – १ कप
उकडलेला बटाटा – १
जिरे – १ टीस्पून
हिरवी मिरची – २ बारीक चिरून
आमचूर पावडर- एक चमचा
सेंधा मीठ – चवीनुसार
कोथिंबीर
तेल
कृती
एका भांड्यात शिजवलेला वरईचा भात घ्या. त्यात उकडलेले बटाटे घालून चांगले मॅश करा. आता त्यात हिरवी मिरची,आमचूर पावडर, सेंधा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे घालून मिक्स करा. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याला कटलेट सारखा आकार द्या. गॅस वर कढईत थोडे तेल गरम करत ठेवा. तेल तापल्यानंतर कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. उपवासाच्या चटणीसोबत गरमागरम कटलेट सर्व्ह करा.