आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आर. के. नगर येथे दोन पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ
पाचगाव वार्ताहर
आर के नगर येथे होणाऱ्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्यांमुळे आर के नगर परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी आर के नगर येथे गुरुवारी केले.
आर के नगर गणपती मंदिरासमोरील टेकडी आणि आर के नगर सोसायटी या दोन ठिकाणी प्रत्येकी सुमारे पाच लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या होणार आहेत. त्यांचा पायाभरणी शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी, पाचगाव आर के नगर परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार असून दहा लाख लिटर क्षमतेच्या या दोन टाक्यांमधून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होईल असे प्रतिपादन केले. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी योग्य नियोजन केले असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडी चे उपसरपंच संजय वास्कर, अमित कदम, माजी उपसरपंच संजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, अमित कदम, दिपाली गाडगीळ, रोमा नलवडे, अतुल गवळी, सोसायटी चेअरमन सुनील वंदुरे पाटील, चंद्रकांत सस्ते, सोसायटी चेअरमन बाबासो बुराटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.