प्रतिनिधी,कोल्हापूर
मराठा आरक्षणाबाबत 24 सप्टेंबरपूर्वी ठोस निर्णय घ्यावा,अन्यथा 25 सप्टेंबरपासून दसरा चौक येथे आमरण उपोषण करणार असल्याचे हिंदु महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांनी बुधवारी जाहीर केले. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करून सकल हिंदु समाजातर्फे पाठींबा व्यक्त करण्यात आला. हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप यांच्यासह सकल हिंदु समाजाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत आहे. याचा परिणाम मराठा समाजातील सर्वच घटकांना भोगावा लागत आहे.राज्य व केंद्र सरकारने समन्वय ठेवून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.या प्रश्नाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर हे 25 सप्टेंबरपासून दसरा चौकात आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांना सकल हिंदु समाजाचे पाठींबा जाहीर केला आहे.
शिष्टमंडळात संभाजी साळुंखे, शिवानंद स्वामी, उदय भोसले, आशिष लोखंडे, दीपक देसाई, पराग फडणीस, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, आनंदराव पवळ, सुरेश यादव, सुधीर जोशी, अशोक देसाई, सुनील पाटील, महेश ऊरसाल, शरद माळी, किशोर घाटगे आदींचा समावेश होता.