तीन राज्यांना जोडणारा सावंतवाडी -आंबोली रस्ता खराब
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी -आंबोली -धवडकी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर सध्या फक्त खड्डे बुजवण्याचे मलमपट्टीचे काम केले जात आहे. मे महिन्यात अखेरच्या क्षणी हा रस्ता डांबरीकरणासाठी घेण्यात आला. आणि पूर्णपणे मर्जीतल्या ठेकेदाराला हा ठेका दोन कोटी 89 लाख रुपयाला देण्यात आला. आणि जवळपास अडीच कोटी रुपये या रस्त्यावर अवघ्या आठ किलोमीटरसाठी खर्च घालण्यात आले. आणि पहिल्याच पावसात हे अडीच कोटी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत. आता सदर ठेकेदाराला तंबी दिल्यानंतर खड्डे बुजवण्याचे फक्त काम केले जात आहे. मात्र हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून तीन राज्यांना जोडणारा आहे. त्यामुळे हा पर्यटन मार्ग असून या मार्गावर गणेश चतुर्थी नंतर हा मार्ग पूर्णपणे पुन्हा खडीकरण डांबरीकरण करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तारकेश सावंत यांनी केली आहे. यापूर्वी आपण वारंवार पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकामकडे केल्यामुळेच हा अत्यंत खराब झालेला रस्त्यावरचे खड्डे आता बुजवण्याचे काम हाती घेतले आहे . मात्र,ही फक्त मलमपट्टी केली जात आहे. आम्हाला ही फक्त मलमपट्टी नकोय . कायमस्वरूपी सुरळीत रस्ता हवाय असे त्यांनी म्हटले आहे.