बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी नेहरू नगरला भेट देऊन परिसराची पाहणी करून तेथील रहिवाशांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच भेटीचे कारण म्हणजे परिसरातील घरांच्या परिस्थितीवर चर्चा करणे होते. सेठ यांनी संबंधित मंत्र्यांशी परिस्थितीबाबत चर्चा केली आणि पंतप्रधान आवास योजनेद्वारे हा प्रश्न सोडवण्याच्या शक्यतेवर चर्चा केली. परिसरातील नागरिकांशी बोलताना सेठ पुढे म्हणाले की, सामान्य लोकांचा घर हा जिव्हाळ्याचा आणि मूलभूत गरजेपैकी एक विषय आहे.घराची तक्रार हा चिंतेचा विषय असून तो सोडविणे याला माझे प्राधान्य राहील. ही परिस्थिती आता निवळली आहे आणि लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाईल यासाठी मी वैयक्तिकरित्या संबंधित नागरिक आणि परिसरातील रहिवाशांच्या संपर्कात राहीन. असे आश्वासन आमदार राजू सेठ यांनी दिले.
Trending
- विदेशी महिलेला जंगलात चक्क साखळदंडाने बांधले
- … तो जबरदस्तीने घरात घुसू लागला अन्…
- वादळी पावसाचा राज्याला दणका
- सर्व आमदारांची कामे होतील
- ‘जुन्या इमारतीं’साठी विधेयक आणणार
- अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी दोघा सिरियल किलरना जन्मठेप
- लोकसभेच्या धक्क्यातून सावरण्यासाठीच लोकप्रिय घोषणा; महापुरात तरी सापत्न वागणूक नको- सतेज पाटील
- पुराचा विळखा, स्थलांतर सुरू