राहूल परब यांचे निवेदन
मालवण । प्रतिनिधी
कसाल -मालवण रस्त्यावरील जरीमरी घाटीची संरक्षक भिंत दुरूस्ती करणेबाबत कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांस निवेदन दिले.कसाल मालवण राज्य महामार्गावरील जरीमरी घाटीची संरक्षक भिंतही कोसळून पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला. तसेच सदर भिंत कोसळून झालेल्या ठिकाणाहुन 500 मीटरच्या अगोदरच्या वळणावर सद्यस्थितीत अजुन एक भिंत कोसळली आहे. तरी लवकरात लवकर ही भिंत दुरूस्त करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले .