प्रतिनिधी / पलुस
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्यावरती चालू असलेल्या अन्यायाच्या विरोधात आमदार अरुण अण्णा लाड व शरद भाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलू्स तालुक्याच्यावतीने पलुस तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले.
भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत असतानाच रासायनिक खतांमध्ये भरमसाठ वाढ करत केंद्राने सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल केले आहे. ही चालू असलेली मगरुरशाही थांबावी व त्वरीत केंद्राने हे वाढीव दर कमी करावेत असे या निवेदनात म्हणले आहे.
यावेळी आमदारअरुण अण्णा लाड म्हणाले, “१०:२६:२६, डि.ए.पी सारख्या खतांमागे ६०० ते ७०० रुपयांची वाढ केंद्रशासनाने करुन शेतकऱ्यांना कंबरडे मोडण्याचे पाप केले आहे. कोरोनामुळे शेतकरी वर्ग अडचणीत असताना शेतकऱ्यांना विशेष तरतुद करण्याऐवजी खतांची दर वाढ करुन शेतकरी संपवण्याचा डाव केंद्र सरकार करत आहे. याचा निषेध करावा तितका कमीच आहे, ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तिव्र आंदोलन उभारु”असा इशारा दिला.
यावेळी पलुस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मारुती आबा चव्हाण, क्रांती साखरचे संचालक दिगंबर दादा पाटील, युवक राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष विनायक महाडिक, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. नंदाताई पाटील, युवती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा पुजाताई लाड, नागराळे गावचे उपसरपंच इंद्रजित पवार, दिपक मदने, प्रा. आनंदराव निकम, सागर शिंदे, विद्यार्थी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मा. संदिप मुळीक, युवती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्राजक्ता जाधव तसेच निवडक पदाधिकारी उपस्थित होते.