वृत्तसंस्था / नवी दिल्ल्ली
टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱया ऍथलीट्सकरिता भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये क्वारंटाईन नंतरही गटागटाने सराव चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. देशातील कोरोना परिस्थिती बिकट होत असल्याने साईने खेळाडूंसाठी सर्व खबरदारीचे उपाय अंमलात आणले आहेत.
टोकियो ऑलिंपिकला जाणाऱया खेळाडूंची प्रत्येक आठवडय़ात कोरोनाची चाचणी घेतली जात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते. या खेळाडूंच्या सरावात कोणताही अडथळा येवू नये याची काळजी साईकडून घेतली जात आहे. या आगामी स्पर्धेपूर्वी खेळाडूंना सरावाची नितांत गरज आहे. दरम्यान साईच्या संकुलामध्ये सराव करताना खेळाडूंचे विविध गट केले जात आहेत. गटागटाने त्यांना सरावाची संधी दिली जात आहे.