कसबा बीड / विश्वनाथ मोरे
करवीर तालुक्यातील पश्चिम भागात कोरोना काळात संसर्गजन्य आजार फैलावू नये म्हणून शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्या आता अंशतः सुरू झाल्याने कसबा बीड, गणेशवाडी, पाडळी खुर्द, कोगे, महे, सावरवाडी, शिरोली दुमाला आदी ठिकाणी आठवी पासून पुढे शाळा सुरू झाल्या आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर शासन नियमानुसार शाळा गजबजू लागल्या आहेत.
गणेशवाडी ता. करवीर येथील शिवाजी विद्यालय गणेशवाडी या शाळेत ज्ञानार्पण करताना नामदेव यादव सर व ज्ञान घेताना विद्यार्थी बऱ्याच दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हळूहळू शाळेमध्ये किलबिलाट सुरू होत आहे.