प्रतिनिधी
सामाजिक अंतराचे भान राखणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेत मंगळवारी बाजारपेठ सुरू झाली. रविवारपेठमध्ये माल उतरविण्यासाठी आणि नेण्यासाठी गर्दी झाली खरी, परंतु सुरक्षा रक्षकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत प्रत्येकाला नियमांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. याशिवाय पोलिसांनीही बाजारपेठेवर लक्ष ठेवून नागरिकांना सातत्याने नियम पाळण्यास भाग पाडले.
मंगळवार हा खरे तर बाजारपेठेचा सुटीचा दिवस. परंतु इतके दिवस लॉकडाऊनमुळे बाजारपेठेची गती थांबली होती. ती पुन्हा गतिमान होण्यासाठी लॉकडाऊनचा काळ संपुष्टात येण्याची प्रतीक्षा व्यापारी करत होते. अर्थात लॉकडाऊन पूर्णत: संपले नसले तरी शिथिल करण्यात आले आहे. याचा फायदा घेत सोमवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली.
गर्दी वाढली तर समूह संसर्ग होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. हे लक्षात घेत सोमवारी रविवारपेठच्या व्यापाऱयांनी बैठक घेतली व सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्याकडे केली. त्यानुसार मंगळवारी रविवारपेठेत हायटेक सिक्मयुरिटीचे सुरक्षा रक्षक दाखल झाले. त्यांनी प्रत्येकालाच नियमानुसार रविवारपेठेत सोडले. त्यामुळे सामाजिक अंतर राखले गेले. गर्दी टाळणे शक्मय झाले आणि बाजारपेठेचे व्यवहारही सुरळीत झाले.
40 दिवसांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर विविध व्यावसायिक आपली दुकाने, आस्थापने हळुहळू उघडत आहेत. अर्थात सरकारने ज्या सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, त्याच उघडल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने किराणा दुकान, धान्य दुकान, चिरमुरे-फुटाण्याच्या भट्टय़ा, फळफळावळे, भाजी, शेती अवजारे, तेल, बी-बियाणे या दुकानांना प्राधान्य देण्यात आले आहे. बेकरी आणि मिठाईचे पदार्थ यांना काही कालावधीसाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार या दुकानदारांनी हळुहळू आपले व्यवहार सुरू केले आहेत. अद्याप तालुक्मयातील शेतकरी शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे बी-बियाणे आणि अवजारे यांची खरेदी मंदगतीने सुरू आहे.
रिक्षाचालकांना प्रवासी वाहतूक करण्यास अद्याप परवानगी नाही
एकूणच शहर परिसरात सर्वत्रच सरकारने दिलेल्या यादीतील दुकाने आणि सेवा हळुहळू सुरू आहेत. मात्र अद्याप वस्त्रप्रावरणाचे एकही दुकान सुरू झालेले नाही. सलून व्यवसायसुद्धा अद्याप बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज अडचणीत सापडला आहे. बाजारपेठ सुरू होताच रिक्षा चालकांनी बाजारपेठेत आपल्या रिक्षा दाखल केल्या. परंतु त्यांना अद्याप पूर्वीप्रमाणे रिक्षा चालविण्यास परवानगी नाही. तातडीचे कारण असल्यास म्हणजेच रुग्णाची ने-आण करण्याची असल्यास रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र रिक्षाचालकांना प्रवासी वाहतूक करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, असे रस्ते वाहतूक अधिकारी शिवानंद मगदूम यांनी स्पष्ट केले.
रविवारपेठेत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. परंतु संपूर्ण बाजारपेठेत अशी सुविधा नाही. त्यामुळे ज्या भागात पोलीस तैनात नाहीत, तेथे नागरिकच सामाजिक अंतराचा नियम धुडकावून लावत आहेत. आता लॉकडाऊनचे नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांवरच अधिक आहे. कोरोना गेलेला नाही, याचे भान राखून त्यांनी नियम पाळणे आवश्यक आहे.
चंद्रकांत गुंडकल, व्यापारी
व्यापाऱयांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंगळवारपासून सुरक्षारक्षकांना नेमण्यात आले आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रांगेत उभे करून सामाजिक अंतर पाळत खरेदी करण्यासाठी आत सोडण्यात येत आहे. त्यामुळे सुरळीत क्यवहार सुरू झाले आहेत. मंगळवार असल्याने काही दुकाने अद्याप उघडली नाहीत. बुधवारपासून आणखी दुकाने उघडतील, परंतु सर्व नियम पाळले जातील.
रस्ते वाहतूक अधिकारी- शिवानंद मगदूम
रिक्षामध्ये फक्त रुग्णाला नेता येईल, त्याच्या सोबत एखादी व्यक्ती असू शकेल, प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद आहे. टॅक्सी असल्यास एका रुग्णासोबत दोन जण चालू शकतील, पण कोणत्याही परिस्थितीत सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी रिक्षा चालविता येणार नाही.