बेंगळूर / प्रतिनिधी
दिग्दर्शक सिरुथाई शिवा यांचा अन्नात्थे हा चित्रपट येत असुन रजनीकांत, कीर्ती सुरेश आणि नयनतारा अशी स्टारकास्ट असलेली ही भाऊ आणि बहिणीची जबरदस्त कथा आहे.
सुपरस्टार रजनीकांतला मोठ्या पडद्यावर बघून आता एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. 2020 मध्ये, त्याचा दरबार हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि थलायवाच्या चाहत्यांची निराशा झाली, पण रजनीकांत आता अण्णात्थेसोबत परतले आहेत आणि ते येथेही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतायत.
कालाईयन उर्फ अन्नत्थे (रजनीकांत) हे पंचायत अध्यक्ष आहेत, त्याचे त्याच्या बहिणीवर, थांगा मीनाची (कीर्ती सुरेश) खुप प्रेम आहे. एकमेकांसाठी कोणत्याही थराला जायला ते तयार असतात. एके दिवशी, कालाईयन मीनाचीसाठी स्थळ बघण्याचं ठरवतो आणि तिची परवानगी मागतो. ती सुरुवातीला मान्य करते पण लग्नाच्या एक दिवस आधी ती पळून जाते. कथा नंतर कोलकाता येथे स्थलांतरित होते, जिथे मीनाचीला संकटानंतर अडचणींचा सामना करावा लागतो. पण, तिचा भाऊ तिच्या नकळत संरक्षक कवचप्रमाणे तिच्या पाठीशी उभा आहे. मीनाची काय झाली? तिला समस्या का येत आहेत? कालाईयन तिला कशी मदत करते? या प्रश्नांची उत्तरे 2 तास 43 मिनिटांच्या सिनेनामध्ये दिली आहेत.