वार्ताहर / बांदा
शेर्ले, मडुरा पंचक्रोशीतील भातशेती पावसाने आडवी केली. लोंब आलेले पीक वाया जाण्याची भीती, शुक्रवारपासून पुन्हा मान्सुन गतिमान झाल्याने पाऊस आणि वाऱ्यामुळे शेर्ले मडुरा पंचक्रोशीतील वालय सारख्या पारंपरिक बियाण्याची लोंब आलेली भातशेती या पावसाने आडवी झाली आहे. शेतीसाठी समाधानकारक पाऊस पडल्याने भातशेती चांगली बहरली आहे. 60 टक्के लावणीला काही प्रमाणात लोंब आले असून 40 टक्के भातशेती पोटरू आलेली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लॉकडाउन असल्यामुळे मुंबई, पुणे येथून आलेले चाकरमानी बरेचजण कामवाचून घरी राहिले त्यामुळे वर्षाच्या तुलनेत या वर्षी शेतीलगवड जास्त झाली आहे.