‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे आपले राष्ट्रीय ग्रंथ म्हणायला हरकत नाही. त्यांचा भारतीयांच्या मनावर, भारतीय संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे. रामायण हे तर आदिकाव्य आणि महषी वाल्मिकी हे आदिकवी! आदर्शाचे कित्येक नमुने रामायणात पहायला मिळतात. म्हणूनच आदर्शाचे प्रतीक श्रीराम आपले प्रेरणास्थान, आदर्शांचा आदर्श! पुढील अनेक कवींना याच महाकाव्याने प्रेरणा दिली. त्यांच्या हातून रामायणावर आधारित अनेक सरस काव्ये, नाटके लिहिली गेली.
कालिदास हा त्यापैकीच एक. त्यांनी ‘रघुवंश’ नावाचे 19 सर्गांचे महाकाव्य लिहिले. खरे पाहता श्रीराम ‘सूर्यवंश’ कुळातले. पण त्याच कुळात ‘रघु’ नावाचा महापराक्रमी आणि अत्यंत उदार राजा होऊन गेला. त्याच्याच नावावरून कालिदासाने या काव्याचे नाव ‘रघुवंश’ असे ठेवले.
हा ‘रघु’ सूर्यवंशीय राजा दिलीप यांचा पुत्र. ख‘वैवस्वत मनु’ हा रघुवंशातील प्रथम पुरुष होता. दिलीप राजा निपुत्रिक होता. त्याची पत्नी सुदक्षिणा. वसि÷ हे राजाचे गुरु. आपल्याला पुत्रप्राप्ती का होत नाही याचे कारण विचारण्यासाठी तो गुरु वसि÷ांच्या आश्रमात गेला. वसि÷ म्हणाले, ‘पूर्वी तू स्वर्गात इंद्राकडे गेला असता, तिथे कल्पवृक्षाच्या सावलीत उभ्या असलेल्या कामधेनूला पाहिले नाहीस, तिला नमस्कार केला नाहीस. म्हणून तिने तुला शाप दिला होता. पण गंगाप्रवाहाच्या आवाजात तो तुला ऐकू आला नाही. म्हणून तुला मूलबाळ नाही. तू जर तिच्या संततीची सेवा केलीस, तर तुला पुत्रप्राप्ती होईल.’ ‘मग मी काय करावे?’ इति राजा. ‘आश्रमात कामधेनूपुत्री नंदिनी आहे. तिची सेवा कर. वानप्रस्थाश्रमासारखे जीवन जग. म्हणजे तिची तुझ्यावर कृपा होईल. राजाने ती आज्ञा मानून तो पत्नीसह तिथे पर्णकुटीत राहू लागला आणि नंदिनीची सेवा करू लागला.
साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता हि साधवः।
तीर्थं फलति कालेन सद्यः साधुसमागमः।।….
सज्जनांचे दर्शन करणे पुण्यकारक असते. कारण ते तीर्थस्थानांप्रमाणे पवित्र असतात तर तीर्थस्थानी जाण्याचे फळ विलंबाने मिळते. पण सज्जनांच्या भेटीचे फळ लगेच मिळते…..पुढे काय झाले….ते पुढील लेखात पाहुया!