बुधवारनंतर सभागृहात वातावरण तापणार : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनंतरच महत्त्वाचे विषय पटलावर येणार
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विधानसभेत बहुतेक खुर्च्या रिकाम्या होत्या. दिवंगतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभागृहात गरमागरमी वाढणार, अशी अटकळ होती. ही अटकळ खोटी ठरली. विरोधी पक्षानेही सोमवारी नरमाईची भूमिका घेतल्याने सारेच फिके वाटत होते.
सोमवारी सकाळी 11.15 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, मंत्री के. एस. ईश्वराप्पा, बी. श्रीरामुलू, माधु स्वामी, एस. टी. सोमशेखर आदींसह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री व निजद नेते कुमारस्वामी, त्यांचे बंधू एच. डी. रेवण्णा आदींनी पहिल्या दिवशी अधिवेशनाकडे पाठ फिरविली.
बेळगाव जिल्हय़ातील आमदारांची संख्या बऱयापैकी होती. मात्र, बाहेरील अनेक आमदारांच्या अनुपस्थितीमुळे रिकाम्या खुर्च्या अधिक दिसत होत्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांना अधिवेशन पाहण्यासाठी यावषी संधी दिली नाही. काटेकोर तपासणी करून प्रेक्षक गॅलरीत प्रवेश दिला जात होता. श्रद्धांजली, प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी इतकेच कामकाज सोमवारी
झाले.
हिवाळी अधिवेशनात गरमी वाढविणारे विषय बुधवारनंतर पटलावर येणार आहेत. कारण मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे दिवंगतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर विशेष विमानाने वाराणसीला रवाना झाले. मंगळवारी दिवसभर त्यांचा उत्तरप्रदेश दौरा आहे. सायंकाळी विशेष विमानाने ते बेळगावला परतणार आहेत. मात्र, कामकाजात भाग घेणार नाहीत. बुधवारपासून मुख्यमंत्री कामकाजात भाग घेणार आहेत.
स्वतः मुख्यमंत्री सभागृहात नसणार, यामुळे गंभीर विषयांवर चर्चा करण्यास कोणीच तयार नाहीत. कारण अर्थखातेही त्यांच्याकडेच असल्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना भरपाई देण्याचा विषय असो, कोरोना महामारीत दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे असो, बेघरांना घरे देण्याचा विषय असो, यासाठी मुख्यमंत्र्यांसमोरच चर्चा झालेली बरी म्हणून अनेकांनी आपले विषय सोमवारी गुंडाळून ठेवले.
या अधिवेशनात एकूण दहा विधेयके मांडण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. खास करून धर्मांतर बंदी दुरुस्ती कायदा पुढील आठवडय़ात मांडण्याची शक्मयता आहे. या विषयावर गदारोळ होणार, हे निश्चित आहे. या गदारोळातच कामकाज गुंडाळावे लागणार आहे. म्हणून पुढच्या आठवडय़ात हे दुरुस्ती विधेयक पटलावर येण्याची शक्मयता आहे.
भोजनाचे वांदे
पहिल्याच दिवशी भोजन व्यवस्था कोलमडली. पत्रकार, अधिकारी व मार्शलसाठी असलेल्या भोजनगृहात खाद्य संपले. काही जणांना केवळ भात-आमटीवर भूक भागवावी लागली. आणखी काही जणांना तेही मिळाले नाही. झुणक्मयाच्या वडय़ा आणि वांगी खाऊन पोट भरून घ्यावे लागले. अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण व्यवस्थाच कोलमडल्याचे दिसून आले.