प्रतिनिधी / बेळगाव
रघुनाथपेठ, अनगोळ येथील चार दिवसांपासून पाणी गळती सुरू असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच तातडीने ती गळती काढून दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.
दोन दिवसांपूर्वी अनगोळ परिसरात पाण्याच्या पाईपला गळती सुरू आहे, असे वृत्त तरुण भारतमधून प्रसिद्ध झाले. या गळतीमुळे भांदूर गल्ली, लोहार गल्ली, मारुती गल्ली, हनुमन्नावर गल्ली, लक्ष्मी गल्ली परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत होता. मुख्य पाईपमधूनच पाण्याची गळती सुरू होती. दररोज हजारो लीटर पाणी वाया जात होते.
त्याबाबत अनेकवेळा कळविण्यात आले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र बातमी प्रसिद्ध होताच तातडीने त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे प्रवीण राजुकर, कृष्णा पार्लेकर हे अधिकारी उपस्थित होते.