वैराग / प्रतिनिधी
वैराग – तुळजापूर, वैराग – माढा हा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त झालेला अाहे. तो लवकरात लवकर दुरुस्त करावा. अन्यथा २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा वैराग तालूका विकास आघाडीचे निमंत्रक किशोर देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
वैराग तुळजापुर व माढा हे दोन रस्ते करून सुमारे विस वर्ष झाले आहेत.त्यामुळे यारस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. व तेफक्त वर्षानुवर्ष बुजवण्याचेच काम केले जाते. तसेच तुळजापुर रोड तर गत दोन महिन्यापुर्वी झालेल्या पावसात मालेगाव जवळ अक्षरश: दोन किलोमीटर वाहून गेला आहे. तरी देखील प्रशासनाला का जाग येत नाही असा सवाल देशमुख यांनी विचारून आत्मदहन करणार असल्याचे सांगितले .
मुंबई, पुणे येथुन तुळजापूरला, नळदुर्ग, उमरगा,अणदुर येथे जाणासाठी नागरिकांना हा मार्ग जवळचा असून, यामुळे सुमारे विस किलोमीटर अंतराची बचत होते. त्यामुळे वैराग – माढा रोडवर काम करण्याकरीता खडी,डस्ट आणुन टाकली होती. मात्र काम न करता ठेकेदार ती उचलुन घेवुन गेल्याने काम होणार नसल्याचे दुसुन येत आहे. दरम्यान वैराग तुळजपुर या रस्त्याचे मालेगाव पासुन रूंदिकरण व नुतनीकरणाचे काम डिसले यांच्या भाग्यश्री कन्ट्रक्शनकडून सुरू झाले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ते बंद झाले. यामुळे देशमुख यांनी मंत्रालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला पण चौकशी करू हेच उत्तर मिळत राहिले. त्यामुळे देशमुख यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर नाही केले तर २६ जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.