वापरणे महत्त्वाचे मात्र दंडाची रक्कम अव्वाच्या सव्वा का? सर्वसामान्य जनतेचा सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनापासून आपला बचाव व्हावा यासाठी प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे. मास्क न घालणे हा मोठा धोका आहे. जनतेने मास्क वापरणे महत्त्वाचे असले तरी मास्क वापरले नाही म्हणून तब्बल 1 हजार रुपये दंड घेणे हा कुठला न्याय आहे, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. एक तर कोरोना महामारीमुळे जीवन जगणे कठीण आहे. त्यामध्ये मास्क घातला नाही म्हणून 1 हजार रुपये भरावे लागले तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी जगायचे की नाही? हे आता प्रशासनानेच सांगायची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी कर्नाटकात मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न घालणाऱयांना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. बेळगावातही त्या आदेशाची अंमलबजावणी बुधवारपासून होत आहे. मास्क घालण्याबद्दल कुणाचेच दुमत नाही. जनतेने सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे. मात्र बऱयाच वेळा मास्क न घालता अनेक जण फिरत आहेत, ते चुकीचे आहे. मात्र त्याबद्दल 1 हजार रुपये दंड आकारणे हे कितपत योग्य आहे?
कोरोनामुळे एक तर रोजगार नाही. व्यवसाय नाही, नोकरी नाही. जीवन जगणे कठीण झाले आहे. असे असताना सर्वसामान्य जनतेला एक हजार रुपये भरणे शक्मय आहे का? आता पोलीसच हा दंड वसूल करणार आहेत. त्यामुळे 1 हजार रुपये दंड वसूल करणार की 100 किंवा 200 रुपये घेऊन त्या व्यक्तीला सोडणार हेदेखील पाहावे लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून कर्नाटकात हा आदेश जारी आहे. 7 ऑक्टोबरपासून बेळगावात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या कारवाईमुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कारण वाहनांची तपासणी करून किती जणांकडून दंड वसूल केला जातो तर किती जणांना सोडले जाते, याचा अनुभव जनतेला चांगल्यापैकी आहे. त्यामुळे मास्क वापरण्याची सक्ती हीदेखील पोलीस खात्याला दंड वसूल करण्याची नामी संधीच असल्याची चर्चा सुरू आहे.
ग्रामीण भागातील जनता बेळगावात येत असते. बऱयाच वेळा घाईगडबडीत काही जण मास्क विसरून येण्याची शक्मयता असते. काही जणांना रक्तदाब व इतर श्वसनाच्या त्रासामुळे सतत मास्क वापरणे धोक्मयाचे ठरू लागले आहे. जो दंड लावण्यात आला आहे तो भरणे अशक्मय आहे. तेव्हा राज्य सरकारकडे जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करून दंडाची रक्कम कमी करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
आजपासून मास्क; जनतेने सतर्क राहणे महत्त्वाचे
बुधवार दि. 7 ऑक्टोबरपासून मास्क न घालणाऱयांना 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. तेव्हा जनतेनेदेखील मास्कशिवाय घरातून बाहेर पडू नये. दिवसभर काम केल्यानंतर 200 किंवा 300 रुपये मजुरी मिळते. जर मास्क घातले नाही तर हजार रुपये भरावे लागतात. तेव्हा जनतेनेही सतर्क राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.