विश्वजित राणे यांची माहिती
प्रतिनिधी / वाळपई
म्हादई अभयारण्य संदर्भात सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी काढलेले अध्त्याधशदैश मागे घेण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांनी कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. लोक या प्रश्नावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे नागरिकांनी त्यांच्या पासून सतर्क राहावे अशा प्रकारचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्?वजित राणे यांनी रविवारी रात्री उशिरा आपल्या वाळपई येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे .
अभयरण्याची अधिसूचना 3 जून 1999 चाली राष्ट्रपती राजवट असताना झाली झाली होती. त्यामुळे अनेक गावावर संकट निर्माण झाले. ते आपल्याला माहित आहे. यासंदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. याअभयारण्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जमिनितील लागवडी कोणत्याही परिस्थितीत अभयारण्याच्या घशात जाणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेणार आहे. आपल्याला वाळपई व सत्तरी तालुक्मयातील राजकारणातून धोका निर्माण करण्याचे षडयंत्र काही राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेला आपल्यावर पूर्ण विश्वास असून जनतेच्या विरोधात जाऊन आपण कोणत्याही परिस्थितीत काहीच करणार नाही अशा प्रकारचे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेली आहे.
जमीन मालकीचा प्रश्न हा सत्तरी तालुक्मयात प्रलंबित आहे. आपल्याला माहित आहे .गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत अस्तित्वात आलेल्या प्रत्येक सरकारने यासंदर्भात गांभीर्याने विचार करणे गरजेचे होते. या प्रश्नासंदर्भात जमीन मालकांनी ही अत्यंत गंभीर होणे गरजेचे आहे .आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकाऱयाकडे जमिनीची हक्क बहाल करण्याचे फक्त शंभर दावे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात उपजिल्हाधिकाकडे दावे सादर करून जमीन मालकी प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावेत अशा प्रकारचे आवाहन विश्?वजित राणे यांनी केलेले आहे.
आतापर्यंत अभयारण्य? व जमीन मालकीच्या संदर्भात सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा पक्षाकडून राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे खरोखरच दुर्दैवी आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील जनतेने आता पारदर्शक प्रमाणात विचार करून आपला निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे .विरोधी पक्ष व विरोधकांकडून होणाऱया भुलभुलय्याना न जुमानता सत्तरीच्या विकासासाठी सर्वांनी सतर्क राहावे अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले आहे.