ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक गिरीश साळवी यांचे दीर्घ आजाराने वरळीतील राहत्या घरी निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. प्रयोगशील अभिनेता, चांगला दिग्दर्शक आणि निर्माता अशी साळवी यांची ओळख होती. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे नाट्यविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
पहिला राजा, समाधी, बाप हा बापच असतो, जाता नाही जात, बुद्धीबळ आणि झब्बू, ७४ पावसाळ्यांचा खर्च ही त्यांची नाटकं रंगभूमीवर गाजली. या नाटकांमधील अभिनय प्रेक्षकांच्या मनात अजुनही घर करुन आहे. सहज साधा वावर, स्पष्ट उच्चार, टायमिंग आणि नाटकांच्या लयीचे उत्तम भान हे त्यांच्या अभिनयाचे विशेष होते.
‘धुडगूस’ या सिनेमाची त्यांनी निर्मितीही केली होती. चं. प्र देशपांडे यांच्या बुद्धिबळ आणि झब्बू नाटकात त्यांच्या अभिनयाची जादू पाहण्यास मिळाली होती.