ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांची निवड राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी झाली आहे.
देशभरातून 10 मुली आणि 12 मुलं अशा एकूण 22 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे.
10 वर्षांच्या झेन सदावर्ते हिनं एका 16 मजली इमारतीत लागलेल्या आगीतून आपल्या शेजाऱयांची सुटका केली होती. तर पंधरा वर्षांच्या आकाश खिल्लारे यानं नदीत बुडणाऱया एका महिलेचा आणि तिच्या तीन वर्षाच्या बाळाचा जीव वाचवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.