सोनी सबवरील साय-फाय काल्पनिक मालिका ‘हिरो गायब मोड ऑन’ने दोन बंधू सिद्धार्थ निगम व अभिषेक निगम यांच्यामधील उत्साहवर्धक ऑनक्रीन केमिस्ट्रीसह प्रेक्षकांना टेलिव्हिजन क्रीनसमोर खिळवून ठेवले आहे. मालिका रोमांचक वळण घेणार आहे, जेथे शिवाय शिवदेवांना भेटतो आणि त्यांच्याकडे मृत अमल नंदाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतो. वीर त्याच्या वडिलांचा मृत्यू पाहून स्तब्ध होतो, पण शिवायला अखेर समजते की दंश राक्षस असला तरी त्याच्यामध्ये मानवाप्रमाणे भावना आहेत. वीरवर विश्वास न ठेवण्याचा आणि दंशला ठार करण्यासाठी प्रयत्न करण्याचा शिवायला पश्चात्ताप वाटू लागतो. वीर आणि त्याचे कुटुंबिय अमल नंदाच्या अंत्यविधीची तयारी करत असताना शिवाय भगवान महादेवला भेटतो आणि मृत अमल नंदाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतो.तसेच भगवान महादेव शिवायला होऊ शकणाऱया परिणामांची जाणीव करून देतात, पण त्याचा शिवायवर कोणताच परिणाम होत नाही. शिवाय निसर्गाच्या नियमाविरोधात जात महादेवांना आव्हान करेल का? की तो स्वतःहून मृत अमल नंदाला पुन्हा जिवंत करण्यामध्ये यशस्वी होईल? वीरची भूमिका साकारणारा अभिषेक निगम म्हणाला, ‘वीरने त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. पण वडिलांचा मृत्यू होताना पाहून तो खूप दुःखी हातो. या सीक्वेन्ससाठी शूटिंग करताना मला खूप काही शिकायला मिळाले. प्रेक्षक आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतील. शिवायची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्हणाला, ‘मालिकेत शिवाय अवघड काळामधून जाताना पाहायला मिळेल.
Previous Articleजिह्यात कोरोनाने 28 मृत्यू
Next Article झिरपवाडी येथे 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.