(या लेखाचा पूर्वार्ध गेल्या शनिवार दि.4 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला होता. आज याचा उत्तरार्ध प्रसिद्ध करत आहोत.)
आम्ही अमेरिकेमध्ये येऊन आज तीन आठवडे होत आहेत. आमच्यासारखे 50 लाखापेक्षा जास्त भारतीय वंशाचे लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कौटुंबिक इत्यादी कारणासाठी आज अमेरिकेमध्ये वास्तव्य करीत आहेत. निश्चितच त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळींना अमेरिकेतील परिस्थितीबद्दल ऐकून चिंता, काळजी वाटत आहे. मला स्वतःला भारतामधून शेकडो फोन, ई-मेल, व्हॉट्सऍपवरून येथील परिस्थितीबद्दल विचारणा करण्यात आली.
आजमितीला अमेरिकेसह जवळजवळ 5 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या तीन आठवडय़ात चढत्या क्रमाने दिवसेंदिवस मागचे विक्रम मोडून कोरोना-19 पुढे वाटचाल करीत आहे. येणारे दोन आठवडे सर्वोच्च संख्या गाठणारे असतील असे येथील तज्ञांचे मत आहे.
आतापर्यंत न्यूयॉर्क शहर, लुझियाना, फ्लोरिडा आदी शहरांमध्ये धुमाकूळ घालून आता फिलाडेल्फिया, न्यूजर्सी येथे कोरोनाने मोर्चा वळवला आहे. अमेरिकेत आता असे एकही राज्य वा शहर नाही की जेथे कोरोनाचा रुग्ण नाही. रविवारी म्हणजे उद्याच ईस्टर संडे हा सण येतो आहे. दरवषी अमेरिकेमध्ये हा सण अमेरिकन नागरिक चर्चेस्मध्ये जाऊन विशेष प्रार्थना करून साजरा करतात. पण यावषी सर्व चर्चेस बंद असल्याने सर्वांना हा सण आपापल्या घरातच साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. न्यूयॉर्कमधील अमेरिकेतील सर्वात मोठे व सर्वात जुने प्रशस्त असे सेंट जॉन कॅथेड्रल चर्च दरवषी हजारो लोकांनी ईस्टरच्या प्रार्थनेसाठी भरलेले असते. तेथे आज प्रार्थनेसाठी बसविण्यात आलेली बाके काढून कोरोना-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळजवळ 1 हजार बेडसह सर्व अत्याधुनिक सोयींसह तात्पुरते हॉस्पिटल बनविण्यात आले आहे. त्या चर्चच्या 125 वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. हे कॅथेड्रल न्यूयॉर्कमधील एक जागतिक आकर्षण असून कोरोनाच्या साथीमुळे बंद असून आज ते हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे.
सध्या एक विशेष चर्चा अमेरिकेत चालू आहे ती म्हणजे भारतातून मागविण्यात येत असलेल्या हैड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची. हे औषध भारतामध्ये मलेरियासाठी वापरले जाते. 2019 मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पुरवठा हा भारतामधून अमेरिकेसाठी करण्यात आला होता. पण भारत सरकारने 4 एप्रिलला हे औषध भारताबाहेर निर्यात करण्यावर बंदी आणली होती. आता अमेरिकेतील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास विनंती करून या औषधाचा पुन्हा पुरवठा करण्यासाठी विनंती केली. त्याला ‘खास मित्राची ओळख कठीण प्रसंगीच होते’ असे म्हणत भारताचे पंतप्रधान मोदींनी या औषधाचा पुरवठा अमेरिकेसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले. अमेरिकेतील डॉक्टर व वैज्ञानिकांनी या औषधाचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही असे म्हणणे मांडले आहे. याउलट काही विशेष तज्ञ म्हणतात की हे औषध घातक आहे. पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे औषध वापरण्यासाठी विशेष आग्रही आहेत.
गेल्या आठवडय़ामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये जवळ जवळ 2 लाख लोकांचा मृत्यू होईल असे भाकित करण्यात आले होते पण आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. या विषयातील तज्ञांच्या मतानुसार हा आकडा आता साठ हजारच्या आसपास आला आहे. अर्थात हा अंदाज आजच्या परिस्थितीनुसार आहे. जर परिस्थिती बदलली तर मृत्यूच्या संख्येत कमी जास्ती होण्याची शक्मयता आहे. ही संख्या इतक्मया प्रमाणात घटण्याचे प्रमुख कारण आहे सोशल डिस्टन्स आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन. आजही 97 टक्के अमेरिकन नागरिक घरामध्येच आहेत व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. त्यामुळेच हा आलेख अपेक्षित दोन लाख मृत्यू ते 60,000 मृत्यू इतक्मया खाली आला आहे असे तज्ञांचे मत आहे.
हे सोशल डिस्टन्स व स्वच्छता याचे पालन अमेरिकेमध्ये कसे केले जाते याबद्दल थोडेसे. आम्ही गेल्याच आठवडय़ात घरातील धान्य, भाजीपाला, दूध व इतर नित्योपयोगी वस्तु आणण्यासाठी वॉलमार्टमध्ये गेलो होतो. नेहमी हजारोच्या संख्येने इथे गिऱहाईकांची गर्दी असते. यावेळी त्यांनीही आपल्या गिऱहाईकांची अडचण होऊ नये म्हणून पिक अप पद्धत चालू केली आहे. वॉलमार्टची अमेरिकेत हजारो केंद्रे आहेत. सर्वसाधारणपणे इतर ठिकाणांपेक्षा सर्व वस्तू स्वस्तात मिळत असल्याने सर्व स्तरातील लोक येथे येत असतात. पण आता कोरोना-19 चा संसर्ग होईल या भीतीने येथे सर्वत्र शुकशुकाट आहे. सुरक्षितता व स्वच्छतेच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून एकावेळी फक्त 30 ते 40 जणांनाच प्रवेश दिला जात आहे. याचा परिणाम म्हणून पिक अप पद्धतीने सर्व वस्तुंचा पुरवठा केला जातो. यासाठी सर्वप्रथम आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तूंची यादी जवळच्या वॉलमार्ट केंद्रामध्ये ई-मेलने पाठवावी लागते. त्यानंतर त्याचे पैसे पेडिट कार्डने भरल्यानंतर आपल्याला एक ठरावीक वेळ दिली जाते. त्या वेळेत तेथे गेल्यावर 1, 2, 3 अशा नंबरनुसार खांब उभे केले आहेत. आपण कुठल्या खांबाजवळ उभे आहोत ते फोन करून सांगितल्यावर आपल्या रिसीट नंबरनुसार सर्व सामान गाडीपर्यंत आणले जाते. आपल्या कारमधून न उतरताच पाठीमागील ट्रंकचा दरवाजा ड्रायव्हर खोलतो. त्यानंतर वॉलमार्टचा कर्मचारी आपण सांगितलेले सर्व सामान ठेवून बंद करतो.
घरी (दारात) आल्यानंतर हॅण्डग्लोज घालून सर्व सामान आत आणून साफ करून नंतर सॅनिटाईज्ड करून काही वेळासाठी घराच्या प्रांगणातच ठेवले जाते. कार आतून बाहेरून संपूर्ण स्वच्छ करावी लागते. कडधान्यांच्या पिशव्या, भाजी व दुधाचे कॅन (अमेरिकेत भारतासारखे घरपोच दूध मिळत नाही) सॅनिटाईज करून नंतर फ्रीजमध्ये ठेवले जातात. दिवसातून एकदा तरी सर्व दरवाजे खिडक्मया सॅनिटाईज करावे लागतात. मग बाहेरील वापरलेले कपडे गरम पाण्यात सॅनिटाईज करून धुतले जातात. गरम पाण्याने साबण लावून संपूर्ण अंग धुतले जाते. दिवसा कुठेही हात लावला की साबणाने हात धुवावे लागतात. चेहऱयाला आपला हात लागू नये याची दक्षता घ्यावी लागते. घरामध्ये सुद्धा 4 ते 6 फूट अंतर ठेवूनच लोक वावरतात. हे सर्व वाचल्यावर आपल्याला वाटेल हा तर स्वच्छतेचा अतिरेकच झाला, पण कोरोनामुळे साधारणपणे प्रत्येक घरात आपल्याला हे दृश्य आज बघायला मिळते.
हे सर्व पाहताना मला माझ्या लहानपणाची आठवण येते. माझी आजी, आई आम्ही बाहेरून आल्यावर हे सर्व आम्हाला स्वच्छतेच्या दृष्टीने करावयास लावायची. स्वतःही अतिशय स्वच्छ राहायची. पण अमेरिकेत कुठेही, काहीही आणि कसेही खाणे, घरात सुटबुटात वावरणे, आत बाहेर अस्वच्छ सवयी असलेल्यांना याची सवय नसल्याने जड जात आहे. ऊठसूठ आलिंगन, चुंबन घेण्याची सवय असलेल्यांना आता स्वतःची पत्नी, मुलगा, पती, आई, वडील, भाऊबहीण किंवा नातेवाईक यांच्या प्रेतालाही हात लावण्याची भीती निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारालाही कोणी येत नाहीत.
97 टक्के लोक गेले तीन आठवडे घरात असल्याने लाखो लोक बेकार आहेत. बेराजगारी आणि गृहकलहामध्येसुद्धा अनेक पटीने वाढ झाली आहे. अमेरिकेत रोज जवळजवळ 600 लोक कॅन्सरमुळे, 500 लोक इतर रोगामुळे, 400 लोक हृदयविकारामुळे, शेकडो लोक रस्त्यावरील अपघातामुळे मरण पावतात. या सर्वांना मागे टाकून एकटय़ा कोरोनामुळे जीव गमावण्याची संख्या आज सर्वांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक 2 मिनिटाला कोरोनामुळे एकाचा मृत्यू होत आहे. यापुढे हे प्रमाण आणखी वाढणार आहे. सर्व योजना प्रभावीपणे राबविल्या तरी येणारे दोन आठवडे कोरोना उच्चांक गाठणार अशी भीती व्यक्त होत आहे. या व्यतिरिक्त मानसिक रुग्ण व नैराश्येमुळे आत्महत्या करणाऱयांची संख्यासुद्धा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्यातरी यावर कोणता ठोस उपाय नाही. यामुळे सर्वत्र भीती, चिंता, अनिश्चितता, जगण्याची धडपड, नैराश्य प्रत्येकाच्या चेहऱयावर स्पष्ट दिसत आहे. आज सर्वत्र सर्वकाळ चर्चा आहे ती केवळ कोरोना, कोरोना आणि कोरोनाचीच.
आजतरी प्रगत विज्ञानाला व समृद्धीला कोरोना नावाच्या एका अदृश्य किटाणूच्या माध्यमातून काळ, निसर्ग आणि निसर्गामागील अद्भूत शक्ती यांना आव्हान दिले आहे. मानव याचा प्रामाणिकपणे विचार करेल का?
आज विसाव्या शतकामध्ये विज्ञान, विशेषतः वैद्यकीय विज्ञान फार प्रगत झाले आहे असे सांगितले जाते. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण हजारो वर्षापूर्वी लोक आजारी पडत असत. त्याची कारणे वेगवेगळी असतील पण आजारी पडत हे महत्त्वाचे आहे. वृद्ध होत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी कायम तरुण कोणीच राहात नाही आणि मृत्यूचे प्रमाण तर 100 टक्के आहे तर मग आपण प्रगती कशामध्ये केली? जेव्हा आपले विज्ञान आजारपणे, वृद्धापकाळ, मृत्यू पूर्णपणे थांबवेल तेव्हाच आपण विज्ञानात प्रगती केली असे म्हणू शकतो. पण हे असंभव आहे. कारण या सर्वांमागे प्रभावी निसर्ग, निसर्गामागील अद्भूत शक्ती आहे. कोरोनासारखे अदृष्य संसर्गजन्य जंतू हे त्याचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. आजही मृत्यूचे गूढ कायम आहे. त्याला सर्वच जण घाबरत आहेत. आज तो कोरोनाच्या रूपाने आपल्यासमोर उभा आहे एवढेच.