प्रतिमा कुतिन्हो यांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
युएई अरब देशात 300 गोमंतकीय कामगार अडकून पडले असून त्यांना पुन्हा गोव्यात आणावे. गोवा सरकार यावर काहीच पाऊले उचलली नाही. त्यांचे कुटुंब सरकारकडे वेळोवेळी मागणी करत आहे. मुख्यमंत्र्यांने याची दखल घेऊन या 300 कामगारांना गोव्यात आणावे अशी मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी काल आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारला स्थानिक गोमंतकीयांचे काहीच पडलेले नाही. गेले अनेक दिवसापासून या कामगाराचे कुटूंब सरकारकडे मागणी करत आहे. हे कामगार पुन्हा आपल्या मायभुमित येण्यास इच्छूक आहे. तरी सरकारकडून त्यांना आणण्याची कुठलीच तयारी दिसत नाही. सरकार परप्रातीय लोकांना राज्यात घेत आहे पण गोमंतकीय कामगार पोटासाठी परदेशात गेले होते त्यांना आणण्यास विलंब करत आहे. जगभर कोरोनाच्या थैमान वाढल्याने अनेक कामगार आपल्या मुळ गावी येत आहे. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन त्यांना लवकर आणवे. याविषयी त्या 300 कामगारांच्या नावासकट निवेदन मुख्यमंत्र्यंना देणार आहे, असे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.
या सर्व कामगारांना खास विमानाने गोव्यात आणावे तसेच त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करावे त्यांची योग्य तपासणी करुन त्यांना आणवे. त्यांचे कुटुंबही सरकारला सहकार्य करायला तयार आहे. पण त्यांना मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन गोव्यात आणावे. आम्ही गोमंतकीयांनी गेले 2 महिने लॉकडाऊनचे पालन केले आहे. आता सरकारच्या चुकीमुळे राज्यात कोरोना रुग्ण वाढले आहे. परराज्याच्या सिमेवर पैसे देऊन काही लोक राज्यात प्रवेश करत आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे, असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत त्या कामगारांचे नातेवाई कही उपस्थित होते.