ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगण्यासाठी चीनने वादग्रस्त परीसरात गाव वसवले आहे. अरुणाचल प्रदेशावरील आपला दावा मजबूत करण्यासाठी चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि एलएसी यांच्यातील वादग्रस्त जागेवर अनेक लोकांना वसवले आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
या गावात 100 घरे बांधून तिथे अनेक चायनीज लोकांची वस्ती वाढवली आहे. अमेरिकन अहवालानुसार 2020 मध्ये, दोन्ही देशांमधील पूर्व लडाखमध्ये वाद सुरू झाल्यानंतर हे गाव वसवण्यासोबतच चीनने सीमेला लागून असलेल्या भागात अनेक ठोस पायाभूत सुविधांचे बांधकामही केले आहे. चीनने सीमेवर हिमालयीन भागात फायबर ऑप्टिक नेटवर्क देखील तयार केले असुन जेणेकरून जलद संवाद साधता येईल आणि परकीय हल्ल्यापासून सुरक्षा वाढवता येईल