प्रतिनिधी / रत्नागिरी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार पत्रकारितेला काळीमा फासणाऱया, देशद्रोही रिपब्लिकन टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांना अटक करा यासाठी काँग्रेस ने राज्यभर आंदोलनं करण्यात आले. रत्नागिरीतही काँग्रेसतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोस्वामी ला अटकेच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष अॅड विजयराव भोसले यांच्या मार्गदरशनाखाली काँग्रेस भवन येथे कार्यकर्ते जमून गद्दार है, गद्दार है….अर्णव गोस्वामी गद्दार है, अटक करा, अटक करा… अर्णव गोस्वामी ला अटक करा, मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी काँग्रेस भवन कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. त्याबाबतचे निवेदन राज्यपाल यांना पाठवण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी भडकवार यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रमेश शहा, जिल्हासरचिटणीस दिपक राऊत, जिल्हाचिटणीस शब्बीर भाटकर, प्रदीप साळवी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हरिष शेकासन, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, शांताराम गाडे, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, विधान सभा क्षेत्राध्यक्ष सचिन मालवणकर, महिला शहर अध्यक्ष रिझवाना शेख, संतोष गोताड ,शरद कापसे, केतकी कापसे, शफाकत काद्री, प्रथमेश गोताड, सुदेश गोताड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वतः समोर असलेली अनेक कामे बाजूला सारत सरकारी लव्याजम्याचा थाट बाजूला सारीत स्वतः रस्त्यावर उतरत आपल्या सहकाऱ्यांसमवेत गंभीर जखमी होऊन पडलेल्या ना मदत केली. जिल्हाधिकारी यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे तिघांचा जीव वाचला. जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेतून त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला घडले आहे.
सायंकाळी जखमी झालेल्याची विचारपूस
ग्रामीण भागाचा दौरा संपून जिल्हाधिकारी सायंकाळी पाच वाजता कार्यालयात आले. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी अपघातात जखमी झालेल्या सुभाष कोकाटे यांचा मुलगा पांडुरंग याच्याकडे दूरध्वनीवरून अपघातग्रस्तांच्या तब्येतीची विचारपूस केली. सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार मोहसीन शेख यांनी अपघातग्रस्तांनाची तब्येत स्थिर असल्याचा निरोप दिला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.