राहुल गांधी यांचा केंद्रशासनावर हल्लाबोल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशात दिवसागणिक कोरोनाचा कहर सुरुच असून कोरोना रुग्णांची संख्या तब्बल एक कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर दीड लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यात दिवसागणिक रुग्णांची भर पडत असून ही संख्या झपाट्याने वाढती आहे. या मुद्यांवरुन देशाच्या राजकिय वर्तुळात ही अनेक घडामोडी घडत आहेत. याच दरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत पून्हा टीकास्त्र सोडलं आहे.
गांधी यांनी ट्विट करत “केंद्र शासनाच्या अपयशामूळेच देशात कोरोनाची भयंकर लाट आली आहे, आणि मजूरांना आपली रोजी – रोटी सोडून पुन्हा एकदा गावाकडे परतावे लागत आहे. या बरोबर देशातील सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था या दोन्हींकरिता त्यांच्या हातात रुपये असणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण वाढवणे गरजेचे बनलेले आहे. या बाबत मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.