मुंबई / प्रतिनिधी
केंद्र सरकाने सर्व सार्वजनिक उद्योग उद्योगपती आणि भांडवलदार यांना विकण्यास सुरुवात केली आहे. सरकार देशातील 45 कोटी कामगारांची पिळवणूक करत आहे, असा आरोप करत भारतातील प्रमुख राष्ट्रीय ट्रेड युनियनच्या कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि देशातील मुख्य शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, लोक संघर्ष मोर्चा, किसान आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन यासह अनेक शेतकरी संघटनांनी शेतकऱयांच्या मागण्यांना घेऊन ग्रामीण महाराष्ट्रही बंद करणार आहेत. तर भारतातील प्रमुख राष्ट्रीय ट्रेड युनियनच्या कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रातील सर्व कारखान्यात, सरकारी कर्मचारी, बँक, बीपीटी, अंगणवाडीसेविका, नाका कामगारांसह असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार क्षेत्र बंद करणार आहेत.
पेंद्राच्या विविध धोरणांच्या विरोधात आज होणाऱया देशव्यापी संपात राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे शिक्षक हे सहभागी होतील. तसेच राज्य कर्मचारी आणि पेंद्र सरकारमधील सर्व कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, असे डॉ. डी. एल. कराड यांनी स्पष्ट केले आहे.