प्रतिनिधी /पणजी
फादर स्टेन स्वामी यांच्या मृत्य हा नैसर्गिक मृत्यू नसून कोठडीत झालेला खून आहे असा आरोप करीत गोवा काँग्रेसने मंगळवारी सकाळी 11 पासून येथील आझाद मैदानावर धरणे धरले होते. सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जे आवाज उठवतात त्यांचा आवाज बंद करण्यासाठी भाजप सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी केला आहे.
आझाद मैदानावर झालेल्या धरणे कार्यक्रमाच्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत विरेधी पक्षनेता दिगंबर कामत आमदार ऍलेक्स रेजीनाल्ड, युवा प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, तसेच काँग्रेसचे रुदाल्फ फर्नांडिस, बिना नाईक, प्रिया राठोड यांच्यासह सुमारे 40 काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना गिरीष चोडणकर म्हणाले की फादर स्टेन स्वामी हे मानवाधिकारी कार्यकर्ते होते. अनुसूचीत जामातीतील लोकांच्या हक्कासाठी ते नियमित सरकारच्या विरेधात उभेराहिले होते. 84 वर्षीय स्टेन स्वमी यांना अटक केल्यानंतर तुरुंगात मुलभूत सुविधाही पुरविल्या नाहीत त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजपाच्या विराधात आवाज उठविणाऱयांचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला आहे. दुपारी स्टेन स्वामी यांना श्रध्दांजली देऊन धरणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.