देशातील पहिलाच प्रयोग , वाळपईच्या गोशाळेत यशस्वी
उदय सावंत/ वाळपई
देशामध्ये भाजपाचे नरेंद्रभाई सरकार सत्तेवर आल्यानंतर डिजिटायझेशन करण्यावर मोठय़ा प्रमाणात भर देण्यात आली. भारतातील प्रत्येक नागरिकांच्या संपूर्ण माहितीचे संकलन करून त्याचे डिजिटायझेशन करून आधार कार्डच्या माध्यमातून ही पद्धत विकसित करण्यात आली. यामुळे आज आपल्याला आधार कार्ड हा महत्वाचा दस्तऐवज ठरलेला आहे. आपण ज्यावेळी बँकांमध्ये जातो त्यावेळी आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. मात्र जनावरांच्या माहितीचे दस्तऐवज म्हणजे अर्थातच आधार कार्ड तयार करण्याची संकल्पना तर खरोखरच सत्यात आली तर कुणाचा विश्वास बसेल का ? अशा प्रकारचा सवाल निर्माण झालेला आहे. मात्र ही खरी गोष्ट आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशांमध्ये असलेल्या सर्व गुरांचे माहिती डिजिटायझेशन करण्याचा विचार सरकारने चालविला असून यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या एका सा?फ्टवेअर माध्यमातून यांच्या अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे .
देशातील पहिलाच अशा प्रकारचा प्रयोग सत्तरी तालुक्मयातील नाणूस याठिकाणी कार्यरत असलेल्या अखिल विश्व श्रीराम गोसंवर्धन केंद्र राबविण्यात आलेला आहे. यागोशाळेत असलेल्या 465 गुरावर हा प्रयोग करण्यात आलेला असून यामुळे सोमवारपासून गुरांना देण्यात आलेल्या एका कोड च्या माध्यमातून संबंधित गुरांची संपूर्ण माहिती डिजिटायझेशन पद्धतीने जगासमोर येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
सदर सा?फ्टवेअर कसे चालते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी रघुनाथ धुरी यांनी सांगितले की केंद्र सरकारने पशुवैद्यकीय खात्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी start-ल्ज् योजनेअंतर्गत ?निमल डिजिटायझेशन आयडेंटिफिकेशन टेक्नकि या कार्यक्रमाच्या अंतर्गत एक विशेष आवाहन केले होते. त्या आवाहनाला अनुसरून बेळगाव कर्नाटक येथील प्रसाद देसाई व सुदीप हुक्केरी या दोघा अभियंत्याने एक खास सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सदर सॉफ्टवेअर केंद्र सरकारला सादर करण्यात आल्यानंतर उत्कृष्ट प्रस्तावाचे खास प्रमाणपत्र पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी या या प्रस्तावाला दिले होते. त्यानंतर याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करताना त्याची सुरुवात सत्तरी तालुक्मयातील नाणूस याठिकाणी असलेल्या अखिल विश्व श्रीराम गोसंवर्धन केंद्रामध्ये सुरुवात झालेली आहे.
हा नेमका प्रस्ताव काय ?
दरम्यान यासंदर्भात रघुनाथ धुरी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रत्येक जनावरांचे विशिष्ट ओळख निर्माण करण्याच्या अनुषंगाने यासंदर्भाची माहिती संकलित करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे सर्वप्रथम गुरांच्या तोंडाचे ठसे त्यांची उंची वजन रंग शेपटीचा गोंडा यासंदर्भाची संपूर्ण माहिती संगणकामध्ये संकलित करून त्यांना एक विशिष्ट कोड देण्यात येत असतो. हा कोड इंटरनेटच्या माध्यमातून जगासाठी खुला करण्यात येत असतो. यदाकदाचित सदर जनावराच्या संदर्भात ज्यांना कुणाला माहिती हवी असल्यास सदर कोडच्या माध्यमातून या जनावरांची संपूर्ण माहिती डिजिटायझेशन माध्यमातून जगासमोर उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असून आतापर्यंत वाळपई गोशाळेत 465 गुरांची माहिती संकलित करण्यात आलेले असून ती सोमवारपासून उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले..
याचे फायदे कोणते.
यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रघुनाथ धुरी यांनी सांगितले की या डिजिटायझेशन प्रकल्पाचा चांगला उपयोग येणाऱया काळात सर्वांनाच होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की देशात कोणत्याही ठिकाणी संबंधित गुरांची माहिती हवी असल्यास कोडच्या माध्यमातून त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित गुरावर भविष्यात कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन करण्याचा विचार असल्यास ही माहिती अधिक फायदेशीर ठरणार आहे .गुरांचे प्रजनन व्यवस्थापन दूध उत्पादन यासंदर्भात चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. यदाकदाचित संबंधित गुरांची विक्री करायची असल्यास ग्राहकांना यांची संपूर्ण माहिती या डिजिटायझेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक अजिबात होणार नसल्याचे धुरी यांनी यावेळी स्पष्ट केले
आज-काल काहीजण प्रत्येक गुरांचे विमा करीत असतो. याप्रक्रियेमध्ये अनेकवेळा फसवेगिरी होताना दिसते. मात्र या डिजिटायझेशन माध्यमातून फसवेगिरीला पूर्णपणे आळा बसणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे यदाकदाचित संबंधित जनावराची चोरी झाल्यास किंवा बेकायदेशीरपणे कत्तल करण्याचा प्रयत्न झाल्यास हा प्रकार डिजिटायझेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. जनावरांचे गुणधर्म विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून याडिजिटायझेशन पद्धतीचा चांगल्या प्रकारे फायदा होणार असून देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
पशुवैद्यकीय खात्याने याचा वापर केल्यास अनेक स्तरावर फायदा.
रघुनाथ धुरी–
दरम्यान यासंदर्भात अधिक बोलताना धुरी यांनी सांगितले की गोवा सरकारच्या पशुवैद्यकीय खात्याने या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अनेक स्तरावर हा त्याला फायदा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या मोठय़ा प्रमाणात गुरांची चोरी होऊन त्यांची कत्तल करण्यात येत असते. यामुळे सरकारला मोठय़ा प्रमाणात डोकेदुखीला सामोरे जावे लागत असते. अशा पद्धतीचा डाटा तयार करून सरकारने आपल्याकडे संकलित केल्यास त्याच्या माध्यमातून बेकायदेशीर कृत्यावर बऱयाच प्रमाणात आळा बसण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.